नाशिक जिल्ह्यातील धरणांत ४९ टक्के साठा

नाशिक जिल्ह्यातील धरणांत ४९ टक्के साठा
नाशिक जिल्ह्यातील धरणांत ४९ टक्के साठा

नाशिक : जिल्ह्यातील २४ धरणांत मागीलवर्षी सरासरी ८० टक्के साठा होता. यंदा तो २४ डिसेंबरपर्यंत ४९ टक्के उरला आहे. डिसेंबरमध्येच धरणांतील पाण्याची पातळी इतकी खाली गेल्यामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवणार असल्याची स्थिती आहे. 

जिल्ह्यात मोठे व मध्यम मिळून एकूण २४ प्रकल्प आहेत. बहुतांश तालुक्‍यांत यंदा पावसाने पाठ फिरवली. नाशिकसह निफाड, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा, सिन्नर तालुक्‍यांत तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. धरणांतील पाणीसाठा वेगाने घटत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांची मिळून साठा क्षमता ६५,८१४ दशलक्ष घनफूट आहे.

यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत धरणांत अवघा ३२,४३२ दशलक्ष घनफूट (४९ टक्के) साठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी तो ८० टक्के (५२,७३८ दशलक्ष घनफूट) इतका होता. मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. धरणांतील साठा वाढण्यास या पावसाचा उपयोग झाला. यंदा मात्र परतीच्या पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्यामुळे साठा वाढू शकला नाही.

जिल्ह्यातील २४ डिसेंबरपर्यंतचा धरणसाठा (टक्केवारी)

धरण  मागील वर्षीचा साठा यंदाचा साठा
गंगापूर  ८४ ६४
वाघाड ८७ ४०
ओझरखेड  ९४ ५८
दारणा  ९० २८
नांदूर मध्यमेश्‍वर ८९ ७६
गिरणा ६१ ३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com