अकोल्यात ४९७ गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
In 497 villages in Akola Possibility of water scarcity
In 497 villages in Akola Possibility of water scarcity

अकोला ः जिल्ह्यात ४९७ गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर ७१२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या कामांसाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये खर्च लागणार असून आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतरच तो अंतिम होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील ४९७ गावांसाठी ७१२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपयांचा खर्च सुद्धा प्रस्तावित करण्यात आला आहे. 

जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या कालावधीसाठी सदर उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहीर, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विहीर अधिग्रहण आदी योजनांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com