संत्रा बागेतील ५० हजारांची फळे गेली चोरीला

संत्रा बागेतील ५० हजारांची फळे गेली चोरीला
संत्रा बागेतील ५० हजारांची फळे गेली चोरीला

अमरावती  ः बागेतील संत्रा व मोसंबी फळांची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्‍यास पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यानंतरही बागेतील फळे चोरी जाण्याच्या घटना नियंत्रणात आल्या नाहीत. शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका बागेतून चोरट्यांनी तब्बल ४५ ते ५० हजार रुपयांच्या संत्रा फळांची चोरी केली.  अमरावती ग्रामीण पोलिसांनी वाढत्या संत्रा, मोसंबी फळांच्या चोरीच्या घटनांमुळे सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर पोलिसांनी एका मालवाहू वाहनासह तब्बल पाच जणांच्या टोळक्‍यास अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली ही दिली. याच टोळीतील तीघे अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.  गुन्हेगारांचे टोळके पोलिसांच्या जाळ्यात असतानाच शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा चोरीची घटना घडली आहे. दिवसेंदिवस चौरीचे प्रकार वाढतच असल्याने संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत.  करजगाव शिवारातील एका बागेतून चोरट्यांनी पुन्हा संत्र्या बागेला टार्गेट करीत फळे लंपास केली. मनोज हिंमतराव तडस यांच्या बागेतील १२ ते १५ हजार फळे पळविण्यात आली. त्याची किंमत ४५ ते ५० हजार रुपये असल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे.  बागेतून फळ चोरीच्या घटनांमध्ये नजीकच्या काळात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी संत्रापट्ट्यात होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com