गडचिरोली : ‘सन्मान’पासून ५२ हजारांवर शेतकरी वंचित

‘सन्मान’पासून ५२ हजारांवर शेतकरी वंचित
‘सन्मान’पासून ५२ हजारांवर शेतकरी वंचित

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी घाईघाईत शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. परंतु त्यानंतर योजनेची अंमलबजावणी रखडली. परिणामी, जिल्ह्यात ५२ हजारांपेक्षा अधिक शेतकरी योनजेच्या लाभापासून वंचित आहेत. 

हमीभाव, दुष्काळी मदत, इतर कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. तीन टप्प्यांत दोन हजार रुपये याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्याचे नियोजन केले. जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. मात्र आतापर्यंत केवळ ६६ हजार ८६ शेतकरी कुटुंबांची नावे एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकली. 

त्यांच्या बॅंक खात्यात शासनस्तरावरून दोन हजार रुपयांची रक्‍कम जमा करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. परंतु पात्र असतानाही माहिती अपलोड न झाल्याने ५२ हजार शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत. 

दरम्यान, ५८३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे बॅंक खाते आणि आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. ५८३३ पैकी ७७३ शेतकरी कुटुंबीयांची माहिती दुरुस्त करुन पोर्टलवर टाकण्यात आली. माहिती अपलोड झालेल्या किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला, याची माहिती शासनाकडेच असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सूत्रांनी सांगितले. 

आचारसंहितेचा फटका प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्याने योजनेची अंमलबजावणी प्रभावित झाली. त्याचाही फटका सामान्य शेतकऱ्यांना बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com