गोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक

ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. परंतु, आजही अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील अशीच रखडली. धान उत्पादक तर शासनाच्या लेखी बेदखलच आहेत. त्यावरूनच शासनाची असंवेदनशीलता दिसून येते. - संजय सत्येकार, शेतकरी नेते, कन्हान.
गोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक
गोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक

गोंदिया : कर्जमाफी आणि बोंड अळीच्या मदतीत भुलविणाऱ्या सरकारने धान उत्पादकांनादेखील वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिल्याचे चित्र आहे. 

पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नर्सरी टाकून मशागत केली. परंतु, २०१७ मधील खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. परिणामी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रात रोवणीच झाली नाही. आठ तालुक्‍यांतील ३८ महसूल मंडळाचा यामध्ये समावेश होता. 

सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे पऱ्हे टाकले. तसेच हवामान विभागानेसुद्धा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला. शेतीची मशागतही त्याआधारे आटोपण्यात आली. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाण्याचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. याचा सविस्तर अहवाल कृषी विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु, शासनाकडून मदतीसंदर्भाने वर्षभरानंतरही कोणताच निर्णय न घेण्यात आल्याने धान उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com