राज्यात ५५२ नवे रूग्ण; विविध ठिकाणी बाराजणांचा मृत्यू

राज्यभरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबरोबरच बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, आत्तापर्यंत एकूण ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात रविवारी (ता.१९)५५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील बारा कोरोनाबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ok
ok

मुंबई : राज्यभरातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाबरोबरच बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, आत्तापर्यंत एकूण ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात रविवारी (ता.१९) ५५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील बारा कोरोनाबाधित रुग्णांचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील एकूण बाधितांची संख्या चार हजार दोनशेच्या पुढे गेली आहे. रविवारी मरण पावलेल्यांमध्ये मुंबई येथील सहा आणि मालेगाव येथील चार, सोलापूरमधील एक, नगर जिल्ह्यातील जामखेडमधील एकाचा समावेश आहे. रविवारी मरण पावलेल्यांमध्ये चार पुरुष आणि आठ महिला आहेत. या बाराजणांपैकी सहा रूग्ण हे साठ वर्षे आणि त्यावरील असून पाच रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत तर ४ हजार २०० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येईल. राज्यात सध्या ३६८ कंटेन्मेंट झोन असून आत्तापर्यंत एकूण ६ हजार ३५९ सर्वेक्षण पथकांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com