जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणी

पैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा ५५.३२ टक्क्यांवर गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
55.32% useful water in Jayakwadi
55.32% useful water in Jayakwadi

पैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा ५५.३२ टक्क्यांवर गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जायकवाडी प्रकल्पावर मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी व बीड जिल्ह्यातील बहुतांश रब्बी पिकांच्या सिंचनाचे भवितव्य अवलंबून असते. यंदा पाऊस चांगला होत असल्याने प्रकल्पात लोकल भागातून पाण्याची आवक होत आहे. नगर, नाशिक भागातील प्रकल्पांमधून अजून पाणी सुटणे बाकी असले तरी प्रकल्पाच्या विस्तीर्ण भागात पाऊस झाला आहे. त्यामुळे जवळपास एक ते दीड महिन्यापासून प्रकल्पात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्पात २९३६ क्युसेक ने पाण्याची आवक सुरू होती. 

प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १९३९.१९४ दलघमीवर, तर उपयुक्त पाणीसाठा १२०१.०८८ दलघमीवर पोहोचला होता. प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्का ५५.३२ वर पोहोचला आहे. कॅचमेन्ट भागात पाऊस झाला, तर प्रकल्पात थोडे बहुत पाणी येते. तूर्त प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याची माहिती उपअभियंता संदीप राठोड यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com