मराठवाड्यात ९ महिन्यात ६३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात ९ महिन्यात ६३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात ९ महिन्यात ६३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

औरंगाबाद : मराठवाड्यात १ जानेवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ३९६ आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीस पात्र तर १८१ प्रकरणे मदतीस अपात्र ठरली. ३९३ प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आली असून, ५९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   नापिकी, कर्जबाजारीपणा आदींमधून आलेल्या विवंचनेतून १ जानेवारी ते २३ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यातील ६३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३, जालना ६२, परभणी ९०, हिंगोली ४६, नांदेड ६४, बीड १२५, लातूर ५६ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांच्या एकूण प्रकरणांपैकी ३९६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी पात्र तर १८१ प्रकरणं अपात्र ठरली आहेत. मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील ५९, जालना ५१, परभणी ५६, हिंगोली २४, नांदेड ३३, बीड १०६, लातूर ३४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे.  शासनाच्या मदतीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २०, जालना ५, परभणी २३, हिंगोली १३, नांदेड २३, बीड १२, लातूर १९, उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात औरंगाबाद जिल्ह्यातील १४, जालना ६, परभणी ११, हिंगोली ९, नांदेड ५, बीड ७, लातूर ३ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणाचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन शेतकरी आत्महत्यांची प्रकरणं वगळता शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरलेल्या  ३९३ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात शासनाकडून ३९३ लाखांची मदत देण्यात आली आहे.  नाशिक जिल्ह्यात  ७५ आत्महत्या कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतीमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र नाशिक जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७५ पर्यंत पोचली आहे. मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील मोठा भाऊ आप्पा शेलार (३५), दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील संदीप अशोक कदम (३०), अशी अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. शेलार यांनी गळफास घेऊन तर पालखेड बंधारा येथे राहणाऱ्या कदम यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com