बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज 

यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित केलेल्या १३०० कोटींच्या पीककर्ज रकमेपैकी ९६८ कोटींचे वितरण झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली आहे.
 बुलडाण्यात ७४ टक्के  शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज  74% in bulldozers Farmers get peak loans
बुलडाण्यात ७४ टक्के  शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज  74% in bulldozers Farmers get peak loans

बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित केलेल्या १३०० कोटींच्या पीककर्ज रकमेपैकी ९६८ कोटींचे वितरण झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेकडून मिळाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीककर्ज वाटपाची अंतिम मुदत असून, या काळात आणखी पीककर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांनी हंगामात पीक लागवडीसह इतर शेतीविषयक कामांसाठी पीककर्ज अत्यंत महत्त्वाचे राहते. यासाठी दर वर्षी शासनाकडून हंगामासाठी नियोजन करीत १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात खरीप पीककर्जाचे वितरण केले जाते.  शासनाने मागील हंगामात थकीत कर्ज माफ केल्याने अनेकांना नव्‍याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. थकीत कर्जाचे पुनर्गठन, तसेच नूतनीकरण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नसल्याची वस्तुस्थितीसुद्धा आहे. जिल्ह्यात १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० कोटींचे पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक या हंगामासाठी घेण्यात आलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ९९ हजारांवर शेतकऱ्यांना ९६८ कोटींचे कर्ज वितरीत झाले आहे. अद्यापही २६ टक्के शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पात्र असलेल्या या शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीककर्ज देण्याची मुदत आहे. गेल्या हंगामात १२६५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले होते. यंदा हा आकडा बँका गाठू शकतील काय, हे ३० सप्टेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. 

‘त्या’ शेतकऱ्यांचे काय  दोन लाखांवर पीककर्ज असलेल्यांना शासनाने जी मदत करण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ अद्यापही अनेकांना मिळालेला नाही. मोठे क्षेत्र असलेल्यांचीही हीच गत आहे. शिवाय नियमित कर्जभरणा करणाऱ्यांचाही विचार झालेला नाही. आम्हाला कर्जमाफी योजनेचा कधी लाभ मिळेल, असा प्रश्‍न शेतकरी सातत्याने बँकांकडे विचारत असतात. 

रब्बीसाठी २५० कोटींचे नियोजन  पीककर्ज वितरणाचा एक ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरू होत आहे. यंदा या हंगामासाठी २५० कोटींचा लक्ष्यांक ठेवण्यात आलेला आहे. यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने रब्बी लागवडीकडे कल राहणार आहे. या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. या शेतकऱ्यांना १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात रब्बी पीक कर्जवाटप केले जाणार आहे. 

प्रतिक्रीया...  पीक कर्जवाटपासाठी बँकांचे काम सुरू आहे. बँकांकडे सादर असलेले प्रस्ताव २८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. कोणीही पात्र शेतकरी पीककर्ज वाटपातून सुटणार नाही.  -नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅँक, बुलडाणा  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com