कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 782 पदे भरण्याच्या हालचाली
कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 782 पदे भरण्याच्या हालचाली

कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 782 पदे भरण्याच्या हालचाली

या प्रकल्पाला जागतिक बॅंकेची साधारणतः येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मान्यता मिळणे अपेक्षित आहे. ती मिळाल्यानंतर तातडीने नियोजित कामे सुरू केली जातील. - विकासचंद्र रस्तोगी , प्रकल्प संचालक

अकोला : राज्यातील 15 दुष्काळी जिल्ह्यांतील चार हजार आणि खारपाणपट्ट्यातील सुमारे 900 गावांत राबविल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी (पोकरा) नवीन 782 पदांच्या आकृतीबंधास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे येत्या काळात हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावात तसेच पश्‍चिम विदर्भात पूर्णा नदीच्या खोऱ्यात असलेल्या खारपाणपट्ट्यातील 900 गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाहायाने चार हजार कोटी खर्चाचा हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जाणार आहे. 15 जिल्ह्यातील पाच हजार 142 गावे यासाठी निवडली आहेत. यासाठी मुंबईत प्रकल्प व्यवस्थापन कक्ष राहणार आहे.

शिवाय जिल्हास्तर, उपविभाग आणि गाव समूह स्तरावर या प्रकल्पाचे मनुष्यबळ काम करेल. या प्रकल्पाच्या संचालकांनी 805 पदांच्या निर्मितीचा शासनाकडे प्रस्ताव दिला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीची नवीन 782 पदांना चक्रीय पद्धतीने मान्यता घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 782 पैकी 290 पदांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.

यापैकी 101 पदे विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने केली जाईल. या पदांकरिता संबंधित प्रशासकीय विभागाकडून अधिकारी न मिळाल्यास सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी बाह्यस्त्रोतातून घेतली जातील. ही सर्व पदे कृषी विभागाच्या आस्थापनेवर राहणार असून प्रकल्प संपुष्टात येताच ही पदेही आपोआप संपुष्टात येणार आहेत.

प्रकल्पामध्ये दुष्काळी गावामध्ये हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वाढ करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पूरक व्यवसाय देणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आहे.

प्रकल्पातील जिल्हे बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, औरंगाबाद, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड, लातूर जिल्ह्यातील गावे.

खारपाणपट्ट्यातील जिल्हे अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यासह मुक्ताईनगर (जि. जळगाव) तालुक्‍यातील 932 गावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com