खानदेशात ८० टक्के पेरणी उरकली

आमच्या भागात पेरणी फारशी राहिलेली नाही. परंतु पाऊस जोरदार नाही. पीकस्थिती बरी आहे. कापसाची लागवड यंदाही अधिक दिसत आहे. - रोहित पाटील, शेतकरी, वडछील, ता. शहादा
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकली
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकली

जळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण होत आली आहे. पुढील १० - १२ दिवसांत आणखी पेरणी होईल. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्थिती बरी असून, कापसाची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर असेल, हे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७ लाख ६५ हजार हेक्‍टरपैकी ७५ टक्के क्षेत्रावर, धुळे जिल्ह्यातील ४ लाख २० हजार हेक्‍टरपैकी ८५ टक्के क्षेत्रावर, तर नंदुरबारमधील २ लाख ७३ हजार हेक्‍टरपैकी ८५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मागील वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत फक्त ६५ टक्के क्षेत्रावर खानदेशात पेरणी झाली होती. यंदा पेरणी होऊन पिकांची उगवणही बऱ्यापैकी आहे. सोयाबीन, कडधान्ये, ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. या आठवड्यात दिलासादायक पाऊस झाल्याने चित्र चांगले आहे. पूर्वहंगामी व कोरडवाहू कापसाचे पिकही बरे असून, कुठेही पीक मोडण्याची वेळ यंदा आलेली नसल्याची माहिती मिळाली.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व धडगाव, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व साक्री आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड, मुक्ताईनगर, रावेर मध्ये काही भागात पेरणी झालेली नाही. कापूस लागवडीस उशीर झाल्याने पीक पुढे चांगले येईल की नाही, असा प्रश्‍न या शेतकऱ्यांसमोर आहे. उर्वरित क्षेत्रात बाजरी, तुरीची पेरणी करण्याची तयारी काही शेतकऱ्यांनी केली आहे. तर काही शेतकरी ताग पेरणीच्या लगबगीत आहेत. यंदा फक्त पाच ते आठ टक्के क्षेत्र नापेर राहील, असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com