कर्जमुक्ती योजनेचे ८९ टक्के काम

कर्जमुक्ती योजनेचे ८९ टक्के काम
कर्जमुक्ती योजनेचे ८९ टक्के काम

जळगाव  ः महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्याचे काम ८९ टक्‍के झाले आहे. सुमारे दोन लाख शेतकऱ्यांची माहिती ‘अपलोड’ करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीस जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलाठी, तहसीलदार, स्वस्त धान्य दुकानदार आदींना या योजनेच्या प्रमाणीकरणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. २९ फेब्रुवारीनंतर प्रत्यक्ष योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्‍यता आहे.  जिल्हा बॅंकेचे एक लाख ५८ हजार ५९ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत बॅंकेचे २१ हजार ५९७ शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाच्या कर्जमुक्‍ती योजनेच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली आहे. २१ हजार १११ शेतकऱ्यांची नावे ‘अपलोड’ करण्याचे बाकी आहे. 

थंब इम्प्रेशनचा करणार वापर योजनेच्या शेतकऱ्यांकडून प्रमाणीकरण करण्यासाठी थंब इम्प्रेशनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी गावपातळीपासून तालुका, शहर पातळीवर यंत्रे देण्यात येतील. ती कशी हाताळावीत, शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण कसे करावे याबाबत २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण होणार आहे. दरम्यान,  ‘अपलोड’ झालेली माहिती बरोबर आहे किंवा नाही, याचे प्रमाणीकरण केले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com