मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन येत्या १०० दिवसांत ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधून पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ‘‘महाआवास अभियान-ग्रामीण’’ राबविले जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ इतके घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ लाख २१ हजार ७२९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. येत्या १०० दिवसांच्या अभियान कालावधीत उर्वरित ५ लाख ३ हजार ८८६ घरकुलांना मंजुरी देण्याचा मानस आहे. तसेच या लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये याप्रमाणे ७५० कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजारांपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.
अभियानाची वैशिष्ट्ये
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.