आदित्य ठाकरे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी

आमदार आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना.
आमदार आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना.

रत्नागिरी  ः ऐन भात कापणीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. लांजा तालुक्यातील कुवे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ठाकरे यांनी भाताच्या नुकसानीचा अंदाज घेतला. ‘‘नुकसानभरपाईसाठी तुम्हाला सरकारकडे जाण्याची गरज नाही, तर सरकार तुमच्याकडे येईल,’’ असे आश्‍वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

क्यार चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी (ता. ३) सकाळी श्री. ठाकरे यांनी कुवे येथून पाहणी दौऱ्याला सुरवात केली. या वेळी विनायक तुकाराम नेमणेंच्या शेतात स्वतः ठाकरे गेले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार उदय सामंत, राजन साळवी यांच्यासह शिवसैनिक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकरी नेमणे यांनी ‘‘आमच्यावर आत्महत्या करायची वेळ आलीय,’’ असे स्पष्ट सांगितले. पावसामुळे भाताला कीड लागली असून सरसकट नुकसानभरपाई द्या अशी मागणीही केली. या वेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची चिंता नको, सरकार त्याचा निश्‍चित विचार करेल असे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com