'चीनबरोबरच्या कापूस निर्यात कराराला गती द्या'

चीनबरोबर कापूस निर्यातीला गती द्या
चीनबरोबर कापूस निर्यातीला गती द्या

वर्धा : चीनमध्ये कापसाची उत्पादकता घटल्याने त्यांच्याकडून भारतीय कापसाला वाढती मागणी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निर्यात कराराला गती द्यावी, अशी मागणी राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. खासदार रामदास तडस यांच्यामार्फत त्यांनी तसे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे. 

भारतात यंदाच्या हंगामात कापसाचे उत्पादन ३३० लाख गाठी होण्याची शक्‍यता आहे. यातील २४० लाख गाठींच्या माध्यमातून भारतीय व्यवसायिकांची गरज भागेल. त्यानंतर सुमारे ९० लाख गाठी शिल्लक राहतील. त्या चीनला निर्यात करण्यात भारताला यश आल्यास देशातील कापूस उत्पादकांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या खुल्या बाजारात कापूस विकला तर शेतकऱ्याला साधारणतः ४०० ते ५०० रुपयांचे क्‍विंटलमागे नुकसान होत आहे. निर्यात झाल्यास कापूस उत्पादकांना मोठा लाभ होईल. खुल्या बाजारात कापसाचे दर साडेपाच हजारावर जातील, अशी शक्‍यता इंगळे वर्तविली.

चीनमध्ये उत्पादनात घट

सध्या चीन आणि अमेरिकेत असलेल्या व्यापार युध्दाचा परिणाम अमेरिकेच्या कापूस निर्यातीवर झाला आहे. यापूर्वी अमेरिकेतून चीनला ६० लाख कापूस गाठींची निर्यात होत होती. ती सध्या ठप्प आहे. चीनमध्ये यंदाच्या हंगामात ३५५ लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत ६० लाख गाठी कमी आहेत. तेथील कापड व्यवसाय मोठा असल्याने त्यांची ६०० लाख गाठींची मागणी आहे. त्यामुळे चीन भारताकडून २४५ लाख गाठींची आयात करू शकतो, असे तिगावकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com