पूरग्रस्तांना नवीन शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई : विनायक राऊत

पूरग्रस्तांना नवीन शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई : विनायक राऊत
पूरग्रस्तांना नवीन शासन निर्णयानुसार नुकसानभरपाई : विनायक राऊत

सिंधुदुर्ग : ‘अतिवृष्टी आणि समुद्राच्या उधाणाचे खारे पाणी घुसून किनारपट्टीतील गावांतील शेती, बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. काहींची जमीन नापीक झाली आहे. अशा पद्धतीने नुकसान झालेल्यांना शासनाच्या नवीन निर्णयानुसार नुकसानभरपाई दिली जाईल,’’ असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी पूरग्रस्तांना चेंदवण येथे दिले.  

खासदार राऊत यांनी पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांची पाहणी केली. यामध्ये मालवण तालुक्यातील चेंदवण, तळशील, देवबाग, देवगड तालुक्यातील कोर्ले याशिवाय अन्य भागांत जाऊन पाहणी करून त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे; त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय ग्रामपंचायतीने देखील पूरस्थितीच्या नुकसानीची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन राऊत यांनी केले.राऊत म्हणाले,

‘‘पुरासोबतच समुद्रकिनारी असलेल्या काही गावांना उधाणाचा तडाखा बसला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती, बागायतीची हानी झाली आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन निर्णयानुसार नुकसानभरपाई दिली जाईल. देवगड तालुक्यातील कोर्ले येथे खाडीकिनारी धूपप्रतिबंधात्मक बंधारा नसल्यामुळेही शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागात धूपप्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.’’

राऊत यांच्यासोबत जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, सुशील चिंदरकर, चेंदवणचे सरपंच उत्तरा धुरी, उपसरपंच दीपक भरडकर, तलाठी परमेश्‍वर सलगर, बाळ धुरी, हेमंत जुवेकर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com