परभणी ः खरीप हंगामात विविध पिकांच्या निकृष्ट (प्रमाणित) बियाण्याचा पुरवठा केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सर्व संबंधितांविरुद्ध एकूण ५७ न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात सोयाबीन बियाण्याचे सर्वाधिक ५१, कपाशी बियाण्याचे ५ आणि कोथिंबीर बियाण्याचा १ खटला आहे. सोयाबीनच्या निकृष्ट बियाणे प्रकरणी एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे यांनी दिली.
मागील खरीप हंगामात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत गुणवत्ता निरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरून बियाणे कायद्याअंतर्गत विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीनंतर ते प्रमाणित असल्याचे आढळून आले. या प्रकरणी तालुका स्तरावरील न्यायालयामध्ये संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले.
सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे, मोहीम अधिकारी ए. एस. जोशी, के. व्ही. आळणे, एस. व्हि. कुपटेकर, बी. बी. खरात, एस. पी. बलसेटवार, यु. एस. शिसोदे, बी. आर. पाटील, एम. पी. कदम, एस. डी. तमशेटे यांनी ही कारवाई केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.