सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके, खते, बियाणे दुकानदारांवर कारवाई केली आहे. यातील १८ परवाने रद्द केले आहेत. २० निलंबित केले आहेत. तर, ३३ जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते गुणवत्तेची उपलब्ध व्हावीत. त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी ३२ गुणनियंत्रक निरिक्षक आणि ११ भरारी पथके आहेत. यंदा खरीप हंगामात महाबीजकडून २१ हजार २१४ क्विंटल, तर खासगी कंपनीकडून ३१ हजार ७११ क्विंटल अशी एकूण ५२ हजार ८५३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली. १५ हजार ६९३ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर ६ हजार ९६६ मेट्रिक टन खते आणि ३ हजार ५३ क्विंटल वाणांचे वाटप केले.
बियाण्यांचे २ हजार ६५, खतांचे २ हजार ७६८ आणि कीटकनाशकांचे २ हजार ३२० वितरक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ७९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. या दरम्यान, जिल्ह्यातील भरारी पथक आणि गुणनियंत्रक पथकाने कृषी सेवा केंद्राची तपासणी केली. यामध्ये ३८२ बियाणे, ६८ कीटकनाशकांचे, २७८ खतांचे नमुने तपासण्यास आले. गुणनियंत्रण कामाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आलेल्या ६९ दुकांनादारांकडे त्रुटी आढळून आल्या. यामध्ये १८ जणांना निलंबित केले आहे. तर, १८ परवाने रद्द केले आहेत. ३३ जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.