नगर जिल्ह्यात संकटातून वाचलेल्या पिकांवर पावसाचा घाला

जिल्ह्यांमधील बहुतांश भागात आलेल्या तसेच उभे असलेल्या बाजरी सोयाबीन भुईमूग आदी पिकांचे या वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यापूर्वीच ठिकाणी जाऊन पाहणी करत माहिती घेतली आहे. शेतकऱ्यांनीही नुकसानीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधावा. - शिवाजी जगताप,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसासह सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. एकतर शेतकरी गत वर्षीच्या दुष्काळामुळे सावरलेला नाही, असे असताना यंदाही दुष्काळापेक्षा गंभीर संकट ओढवले आहे. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. - संजय तांबे, शेतकरी, बोधेगाव, ता. पाथर्डी, जि. नगर
नगर जिल्ह्यात संकटातून वाचलेल्या पिकांवर पावसाचा घाला
नगर जिल्ह्यात संकटातून वाचलेल्या पिकांवर पावसाचा घाला

नगर : खरिपातील विविध संकटातून वाचलेली पिके गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पूर्णत: वाया गेली आहेत. जिल्ह्यात काढणीला आलेला भात,  बाजरी, सोयाबीन, भुईमूग यासह कापसाचे साधारण ८० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तरीही प्राथमिक माहितीनुसार, साधारण दोन लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाल्याचा अंदाज आहे. विविध संकटांतून वाचलेली पिके हाती येण्याआधीच त्यावर पावसाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले  झाले. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे चार लाख ७८ हजार ६३८ हेक्‍टर क्षेत्र आहे. या वर्षी ५९११२६ ७० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यातील बाजरीचे क्षेत्र १ लाख ६० हजार २४७ हेक्टर आहे. ८८ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी आहे. मक्याचे क्षेत्र साधारण ७८ हजार ५४७ हेक्टर आहे. 

गतवर्षीच्या दुष्काळातून बाहेर पडत यंदा खरिपाची पेरणी झाली. मात्र त्यानंतरही पिकावर संकटे आली. मक्याचे लष्करी आळीने पूर्णतः नुकसान केले, तर कापसाची वाढ खुंटली. बाजरीलाही फटका बसला. अशा सर्व संकटातून तरलेली पिके मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हिरवली.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्याचा गंभीर परिणाम काढणीला आलेल्या पिकावर झाला आहे. भात, बाजरी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. पिकांची स्थिती बघवत नसल्याची स्थिती आहे. बाजरीसह कापसाला बोंडात कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेल्या कापसाचे बोंडातही कोंब फुटलेले आहेत. भुईमूग, सूर्यफूल आणि भाताचे साधारण ८० टक्के नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटाने बहुतांश शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. 

नेमके किती नुकसान झाले, याची माहिती अजून कृषी विभागाकडे आली नाही. जिल्ह्यात साधारण दोन लाख ८० हजार हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार दिसून येत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपूर्वीच झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. 

नगर जिल्ह्यातील अंदाजे बाधित क्षेत्र 

पीक क्षेत्र (हेक्टर) 
भात १०, ०००
बाजरी १,१०,०००
मका  २५,०००
भुईमूग  ३,०००
सोयाबीन ६०,०००
कापूस ७०,०००
तूर २०,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com