रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य: आदिनाथ चव्हाण

Adinath chawan
Adinath chawan

नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जागरूक झालेला ग्राहक रासायनिक अवशेषमुक्त शेती उत्पादनांची मागणी करू लागला आहे. त्यामुळे यापुढे रासायनिक अवशेषमुक्त शेतीलाच भवितव्य राहील, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले. नाशिक येथे सुरू असलेल्या नवव्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (ता. २५) श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे, सतीश मोटे उपस्थित होते. या वेळी श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. चव्हाण यांना 'कृषी माउली' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती या विषयावर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र सेंद्रिय माल उत्पादन ते विक्री व्यवस्थेबाबत शेतकऱ्यांना तोकडी माहिती दिली जाते. काळाची गरज ओळखून सविस्तर मार्गदर्शन गरजेचे आहे. जगभरात सेंद्रिय व रसायन अवशेषमुक्त शेतमालाची मागणी आहे. आज शेती व्यावसायिकदृष्ट्या होते आहे. त्यातून ग्राहक मिळविण्यासाठी रासायनिक अवशेषमुक्त उत्पादनासाठी प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सांगितले.  शेतकऱ्यांच्या सदैव मदतीसाठी ‘ॲग्रोवन' आजचा शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीकडे वळत आहे. त्यामुळे ज्ञानाशिवाय प्रगती नाही. शेती क्षेत्रातील विविध प्रयोग, नवनवीन संकल्पना ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जात आहेत. या ज्ञानाचा शेतकऱ्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com