सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांच
बातम्या
पगारासाठी ‘आदिनाथ’च्या कामगारांचे आंदोलन
करमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या थकीत पगारासाठी सोमवारी (ता. २) साखर आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केले. या वेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना कामगार आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्या पगारी देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, अशी माहिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष नाना साखरे यांनी दिली.
करमाळा, जि. सोलापूर : करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या थकीत पगारासाठी सोमवारी (ता. २) साखर आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केले. या वेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना कामगार आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्या पगारी देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, अशी माहिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष नाना साखरे यांनी दिली.
या आंदोलनात शहाजी ठोसर, अप्पा भोसले, सुनील भोसले, महादेव मस्के, दूरदे, शहाजी धेंडे, एल. डी. कांबळे, विनायक पवार, विजय शिंदे, दत्ता चिचकर, धनंजय फडतरे, सोमनाथ क्षीरसागर, दत्तात्रय दबडे, हनुमंत पाटील, रमेश करे, शिवाजी डिकोळे, कल्पना पाटील, सारिका लोंढे, बी. बी. लालबेग, सुसाबाई धेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या.
कांबळे म्हणाले, ‘‘साखर आयुक्तांनी आंदोलकांबरोबर अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्याशी आमच्यासमोर चर्चा केली. ४१ महिन्यांचा पगार व्यवस्थापनाने न दिल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगारीसाठी साखर जप्त करण्यासाह योग्य कारवाई करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.’’
या प्रश्नावर आयुक्तांनी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, कारखान्याचे अध्यक्ष व शेतकरी कामगार संघर्ष समिती व कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची दोन दिवसांत बैठक घेऊन कामगारांचे पगार देण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत, असे साखरे यांनी सांगितले.
- 1 of 912
- ››