नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने अन्याय दूर करावा

The administration should eliminate injustice by reducing money laundering
The administration should eliminate injustice by reducing money laundering

नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. विविध रोगांच्या प्रादुर्भावाने पिके वाया गेलेली आहेत, असे असताना शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यामधील अनेक गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्ती दाखवली आहे. ती पन्नास पैशापेक्षा कमी लावावी, अशी मागणी शेतकरी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे, चंद्रकांत निकम, उद्धव सोनवणे, भिवसेन गिरमकर, संजय उगले, विठ्ठल पंडित यांच्यासह शेतकऱ्यांनी शेवगावच्या प्रभारी तहसलीदार अमिषा मित्तल यांना निवेदन दिले. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. यंदा परतीचा पाऊस चांगला झालेला असला तरी खरिपातील पिके पुरेशा पावसाअभावी वाया गेली होती. तर रब्बीत पाणी उपलब्ध झालेले असले या वर्षी सातत्याने बदलत्या वातावरणामुळे ज्वारी, हरभरा, तूर ही पिके मात्र विविध रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादन फारसे निघाले नाही. 

मात्र, किटनाशके व अन्य बाबीवर खर्च अधिक झालेला आहे, असे असताना शेवगाव तालुक्यातील ७९ गावांसह जिल्हाभरातील अनेक गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी लावणे गरजेचे असताना ती पन्नास पैशापेक्षा जास्ती लावलेली आहे. जास्तीची पैसेवारी लावल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झालेला असून पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी लावावी, अशी मागणी शेतकरी मंडळाने केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com