सोलापुरात भाजीविक्रीच्या नियोजनात प्रशासनाचा गोंधळ

सोलापूर : ‘कोरोना’मुळे बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. त्यामुळे महसूल आणि महापालिका प्रशासनाने शहरात सहा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी दिली. पण, शहराचे सर्व रस्ते बंद केल्याने आणि पोलिसही सरसकट पासची मागणी करत असल्याने अगदी मोजकेच शेतकरी तिथपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे शहरात फळभाज्या आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. ठरवलेल्या या ठिकाणच्या नियोजनामध्ये प्रशासन पुरते गोंधळल्याचे चित्र आहे.
Administration's confusion in the planning of vegetable sales in Solapur
Administration's confusion in the planning of vegetable sales in Solapur

सोलापूर : ‘कोरोना’मुळे बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. त्यामुळे महसूल आणि महापालिका प्रशासनाने शहरात सहा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी दिली. पण, शहराचे सर्व रस्ते बंद केल्याने आणि पोलिसही सरसकट पासची मागणी करत असल्याने अगदी मोजकेच शेतकरी तिथपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे शहरात फळभाज्या आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. ठरवलेल्या या ठिकाणच्या नियोजनामध्ये प्रशासन पुरते गोंधळल्याचे चित्र आहे. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील १० हुन अधिक ठिकाणे सील केली आहेत. त्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून शहरात संपूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. केवळ सकाळचे दोन तास दूध आणि भाजीपाला यासाठी वेळ देण्यात आला आहे. शहरातील होम मैदान, कर्णिक नगर, केशवनगर या ठरवून दिलेल्या ठिकाणी शहरातील ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी तुटून पडत आहेत. त्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याची स्थिती आहे. 

शहरानजीकच्या ठिकाणाहून भाजीपाला घेऊन शहरात जायला आणि ठरलेल्या ठिकाणी पोहचायला किमान तासभर लागतो. पण, तोपर्यंत दिलेली वेळ संपते. शिवाय नाक्या-नाक्यावर पोलिस बंदोबस्त असल्याने शेतकऱ्यांना हात जोडून विनवणी करून आत प्रवेश करावा लागतो. ही सगळी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिवाय वेळेमुळे बसून विक्री करण्याला मर्यादा येतात. साहजिकच, किरकोळ विक्रेत्याला मिळेल, त्या भावात भाजी विक्री करून लगेच ते माघारी परतत आहेत. नेमका याचाच गैरफायदा शहरातील किरकोळ विक्रेते घेत आहेत. अव्वाच्या सव्वा दरात पुढे त्याची विक्री करत आहेत.  समन्वयाचा अभाव 

‘कोरोना’मुळे सध्या महसूल विभागाचे प्राधान्य त्याच्या नियंत्रणाकडे आहे. त्यामुळे अन्य विषयाला दुय्यम स्थान आहे. पण, भाजीपाला आणि दूध यासारख्या प्राधान्याच्या आणि अत्यावश्यक सेवेतील वस्तू असूनही प्रशासनाला त्याचे नेमके नियोजन करता येऊ शकत नाही. महसूल, कृषी आणि बाजार समिती यांच्यात समन्वय नसल्याचेच हे चित्र आहे. शेतकऱ्यांना शहरात भाजीविक्रीसाठी पास देण्याबाबत पोलिस चालढकल करत आहेतच. पण, आता कृषी विभागाकडून पास देण्याची सूचना असूनही, त्याबाबतही काहीच हालचाली नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com