थंडीचा गहू, हरभऱ्याला फायदा

थंडीचा गहू, हरभऱ्याला फायदा
थंडीचा गहू, हरभऱ्याला फायदा

जळगाव : खानदेशात मागील २५-३० दिवसांपासून थंडी टिकून असल्याने गहू व हरभऱ्याचे पीक जोमात आहे. परंतु रब्बी ज्वारी व केळीला फटका बसला असून, आता ज्वारीची वाढही कमी झाली आहे. 

गव्हाची पेरणी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत यंदा बऱ्यापैकी आहे. सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची आहे. कोरडवाहू हरभरा कमी आहे. कारण पुरेसा ओलावा नव्हता. सिंचनाचे स्राोत असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली. सध्या थंडीमुळे सिंचनाची हवी तेवढी गरज मात्र गहू व हरभरा पिकात नाही. कारण थंडी टिकून आहे. पहाटे हुडहुडी भरते, तर दुपारी फक्त २ ते ३.३० पर्यंत तापमान ३२ अंश सेल्‍सिअसवर असते. त्यानंतर गार वारे वाहतात. 

काळ्या कसदार जमिनीत फक्त दोन वेळेस हरभरा पिकाला पाणी लागेल, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेर, यावल, चोपडा भागांत काळ्या कसदार जमिनीत गहू पिकाला यंदा चार वेळेस सिंचन करावे लागेल, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी गहू निसवला आहे. हरभऱ्याला घाटे लागले असून, त्यांची चांगली वाढ होत आहे. थंडी अधिक असल्याने ज्वारीची मात्र वाढ कमी दिसत आहे. दाणे भरण्याची प्रक्रिया मंदावल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी ज्वारीची पीक पिवळे, कोरडे पडले असून, त्याची कणसे वाळली आहेत, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com