नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे : तोटावार

वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे २५ ते ३० टक्के रॅन्‍डम पद्धतीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना आहेत.
Affected farmers should cooperate for the survey: Totawar
Affected farmers should cooperate for the survey: Totawar

वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे २५ ते ३० टक्के रॅन्‍डम पद्धतीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे गावस्तरावर पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चालू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कृषी सहायकांच्या संपर्कात राहून रॅन्डम सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

तालुका कृषी अधिकारी व तालुका विमा प्रतिनिधी हे रॅन्डम पद्धतीने गावे व शेतकऱ्यांची नावे निश्‍चित करून पंचनाम्याची कामे करीत आहेत. काही शेतकऱ्यांचा पीक विम्याबाबत नुकसानीची पूर्वसूचना देऊनही पंचनामा झालेला नाही, असा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा एक लाख ४०  हजार ६५० शेतकऱ्यांनी एक लाख ५३ हजार १०२ हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित केला. १५ ऑक्टोबरअखेर ९८ हजार १९७ शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे काढणीपश्‍चात नुकसान झाल्याचे विमा कंपनीस पूर्वसूचना दिल्या आहेत. सोयाबीनचे क्षेत्र तीन लाख हेक्टर आहे. १५ ऑक्टोबरअखेर २५ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लाख ६ हजार ३६२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कळविले आहे.

१७ ऑक्टोबरच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे काढणीपश्‍चात नुकसानीची पूर्वसूचना कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावी. यापूर्वी उभ्या पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कंपनीस पूर्वसूचना दिली असेल, या पावसामुळे कापणीपश्‍चात पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे पुन्हा पूर्वसूचना द्यावी. काढणीपश्‍चात म्हणजेच कापणीनंतर एकदाच अर्ज करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेचा आणि शासनाच्या नैसर्गिक आपत्तींबाबत झालेल्या सर्वेक्षणाचा काहीही संबंध नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत वैयक्तिक नुकसानीचा अर्ज दिला जातो. त्यामुळे या सर्वेक्षणाचा व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पंचनाम्याचा काहीही संबंध येत नाही, अशी माहितीही तोटावार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com