कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्ह्यात ४९ शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्ह्यात ४९ शेतकऱ्यांची आत्महत्या
कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्ह्यात ४९ शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक :  सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरदेखील नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे ४९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, निकृष्ट बियाणे, बोंड अळीचा प्रादुर्भाव अशी अनेक संकटे सातत्याने त्यांच्यावर आली. यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.  

यंदा १ जानेवारीपासून आतापर्यंत ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यात मार्च महिन्यात सर्वाधिक १० शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविले आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी कीटकनाशकांतून विषबाधेला सामोरे जावे लागले. आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना सरकारच्या निकषानुसार कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मात्र कमी आहे.

आत्महत्याग्रस्त ४९ पैकी अवघ्या ९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहेत. २१ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. तर १५ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक ९ शेतकरी आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या अाहेत. त्याखालोखाल सिन्नरमध्ये ७, दिंडोरी ७, निफाड ६, बागलाण ५, नाशिक ३, देवळा ३, त्र्यंबकेश्वर ३, येवला २, चांदवड २, इगतपुरी १ आणि नांदगावमध्ये १ शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

महिनानिहाय झालेल्या शेतकरी आत्महत्या

महिना संख्या
जानेवारी  ९
फेब्रुवारी  ४
मार्च  १०
एप्रिल     ६
मे  १०
जून  ८
जुलै  २

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com