उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार दिवसांनंतर बंद

उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार दिवसांनंतर बंद
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार दिवसांनंतर बंद

वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पिकांची होरपळ होऊ लागल्यावर व वांगीकरांच्या उद्रेकानंतर ताकारी योजनेतून शून्य ते ४४ कि.मी. साठी सोडलेले पाणी चार दिवस सोडल्यानंतर बंद करण्यात आले. या वर्षी वाढत्या उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. दरवर्षी व्यवस्थित यंत्रणा हाताळणारे ताकारीचे अधिकारी-कर्मचारीही मेटाकुटीला आले. पाणी दिल्यानंतर महिन्यातच खडखडाट होत असल्याने योजनेवर ताण पडत आहे. पाणी वितरण करताना वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. त्यातूनच मागील आठवड्यात वांगीकर शेतकरी व पाटबंधारे प्रशासनांत खडाजंगी झाली. १७ ते २० एप्रिलपर्यंत पाणी सोडण्यात आले. 

या चार दिवसानेही ० ते ४४ मधील पोटकालव्यातून सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. तरीपण नियोजनानुसार पाणी पुढे नेण्यास शेतकरी तयार झालेत. त्यास अनुसरून आज कुंभारगाव ते नेवरीपर्यंतचे पोटकालवे मुरूम भरून बंद करण्यात आले. पाणी तासगावकडे सोडण्यात आले. 

ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील म्हणाले, ‘‘तासगाव तालुक्‍यातील पुणदी तलाव भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून १२ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे भरून पाणी मागितले आहे. त्यांच्या आदेशानुसार पाणी चार दिवस पुणदी तलावात सोडणार आहोत.’’

वांगी परिसरातील बहुतांश पाटांना शेवटपर्यंत पाणी पोचले नाही. बहुतांश ओढे कोरडेच राहिले, पिकांना पाणी देताना पराकाष्ठा करावी लागणार आहे. आणखी आठ दिवसांनी पुन्हा टंचाई जाणवणार आहे. पाणी देण्याची व्यवस्था पाटबंधारेने करावी. म्हणजे वादाचा प्रसंग उद्‌भवणार नाही. -डॉ. विजय होनमाने, सरपंच, वांगी, ता. कडेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com