विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष

खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून ५६ हजारांवर विमाधारकांपैकी अवघ्या ४१०० शेतकऱ्यांना विमाभरपाई मंजूर केली आहे.
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष Against the insurance company Anger among farmers
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष Against the insurance company Anger among farmers

गोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून ५६ हजारांवर विमाधारकांपैकी अवघ्या ४१०० शेतकऱ्यांना विमाभरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई अवघ्या काही लाखांच्या घरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कंपनी विषयी रोष व्यक्त होत आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी २८ हजार ९१५ हेक्टरमधील पिकांचा विमा उतरविला होता विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी दोन कोटी दोन लाख रुपयांचा हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीची भरपाई या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र व्यावसायिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाईच्या मुद्द्यावर ठेंगा दाखविण्यात आला आहे.

खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदी काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने आणि भागात जमीन खरडून गेली वाळूचे थर शेतात पसरल्याने ही जमीन बहुतांशी नापेर झाली आहे. त्यानंतरच्या काळात पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड खर्च भरून काढणे कठीण झाले पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिली पण या कंपनीने यासाठी तीन वेगळे निकष लावत त्या आधारावर शेतकऱ्यांना भरपाईसाठी पात्र ठरविले, त्यामुळे हजारो विमाधारक भरपाईपासून वंचित राहिले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगामुळे अंदाजे ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विमा कंपनीने मात्र ५६६४० शेतकऱ्यांपैकी केवळ सहा हजार ८४० तक्रारदार शेतकऱ्यांपैकी ४१०० शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरविले आहे. वीस हजारांवर शेतकऱ्यांनी नुकसान होऊन देखील तक्रार न केल्याने त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मिळाली अवघी ६१ लाख भरपाई शेतीपिकाचे नुकसान झाल्यावर विमा कंपनीला ७२ तासांत कळवावे लागते. याअंतर्गत तक्रार केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४६९० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यापैकी ४१०० शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही भरपाई केवळ ६१ लाख रुपयांची आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com