पुणे ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची रक्कम मिळालीच पाहिजे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत मंगळवारी (ता. १९) अखिल भारतीय किसान सभेने कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला.
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून पीकविम्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेने मंगळवारी वाकडेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयावरून कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कॉम्रेड अजित अभ्यंकर, किसान सभेचे जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे, बीड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मुरलीधर नागरगोजे, अॅड. नाथा शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
या वेळी किसान सभेच्या वतीने तुटपुंज्या नुकसानभरपाईचे गुंठ्याला ८० रुपयांचे पाकीट पंतप्रधान, राज्यपाल आणि कृषी आयुक्तांना देण्यात आले. अॅड. अजय बुरांडे म्हणाले, की विमा कंपनी केवळ सीएससी सेंटरने केलेल्या चुकीमुळे विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यासंदर्भात कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे मागणी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.