पुणे : महाराष्ट्रामध्ये बाजार शुल्क हे ५० पैसे ते एक रुपया घ्यावा, असा कायदा आहे. मात्र हेच बाजार शुल्क पंजाब आणि हरियाणामध्ये ८ रुपयांपर्यंत आहेत. हे बाजार शुल्क आता बाजार समित्यांना आकारता येणार नसल्याने अडते आणि बाजार समित्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी आंदोलन पुरस्कृत केले आहे, असा आरोप भाजप नेते, माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (ता.१४) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. तर या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे देखील पाटील म्हणाले. भाजपच्या वतीने केंद्राच्या सुधारित कृषी आणि पणन कायद्यांच्या समर्थनार्थ देशभरात ७०० पत्रकार परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत. या मधील पुणे शहर आणि जिल्ह्याची पत्रकार परिषद पाटील यांनी घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ज्येष्ठ नेते वासुदेव काळे आदी यावेळी उपस्थित होते. या वेळी पाटील म्हणाले, ‘‘शेतीमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी परकीय गुंतवणूक होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. शेतकऱ्यांना बाजार स्वातंत्र्य देण्यात आले असून, बाजार समिती कायद्यात कोणताही बदल केलेला नाही. मात्र विरोधक किमान आधारभूत किमतींबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.