...अन्यथा अंबानी यांच्या घरावर मोर्चा काढणार ः खासदार शेट्टी

परभणी आंदोलन
परभणी आंदोलन

परभणी : पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून कॉर्पोरेट कल्याण योजना झाली आहे. शेतकऱ्यांचा घात करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांपुढे सरकारने गुडघे टेकले आहेत. दूध आंदोलनातून मोकळे होईपर्यंत सरकारने पीकविमा परताव्या प्रश्न निकाली काढावा, अन्यथा अनिल अंबानी यांच्या घरावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पीकविमा परताव्यासाठी २६ जूनपासून परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची रविवारी (ता. ८) खासदार शेट्टी यांनी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, की रिलायन्स विमा कंपनीसह अन्य कॉर्पोरेट कंपन्यांनी देशातील शेतकऱ्यांचा घात केला आहे. ९ हजार ४१ कोटी विमा हप्ता भरलेला असताना केवळ ८१२ कोटी रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला. पंतप्रधान पीकविमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून कॉर्पोरेट कंपन्या तसेच अंबानी कल्याण योजना झाली आहे. न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी लढाई चालू ठेवावी. या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे.

पीकविमा परतावा देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, अन्यथा दूध आंदोलनातून मोकळे झाल्यानंतर अनिल अंबानी यांच्या घरावर चाल करून जाऊ. मग कोण वाचवायला येतयं ते पाहू. शेतकरी की अंबानी कोण सांभाळायचे हे सरकारने ठरवावे, असेही श्री. शेट्टी यांनी यावेळी नमूद केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, वस्त्रोउद्योग महामंडाळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भाकपचे राजन क्षीरसागर, श्रीनिवास जोगदंड आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com