शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अकोल्यात `वंचित`चा आक्रोश मोर्चा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

अकोला  ः जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना भरीव मदत मिळावी, कोणताही सर्व्हे न करता एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेले सोयाबीन तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन, उडीद, मुगाच्या शेंगांना कोंब फुटले होते. ज्वारीचेही अतोनात नुकसान झाले. कापूसही भिजला होता. खरिपात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. आता हा पैसाही परत करण्याची स्थिती शेतकऱ्यांची राहिलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी दुपारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, वंचितचे आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर हा मोर्चा अडविण्यात आला. येथून एक शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेले.

मोर्चामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोदे, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोंडे, प्रा. धैर्यवर्धन फूंडकर, प्रतिभा अवचार आदी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा वंचित आघाडी अधिक आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com