छावण्या बंद झाल्याने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा

चार छावण्यांच्याप्रश्नी आंदोलन करताना शेतकरी
चार छावण्यांच्याप्रश्नी आंदोलन करताना शेतकरी

नगर  : जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नसतानाही चारा छावण्या बंद केल्या जात असल्यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी सोमवारी (ता. १) आक्रमक झाले. प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. तातडीने चारा छावण्या सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

नगर जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक होती. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याचे कारण पुढे करीत प्रशासन या छावण्या बंद करीत आहे. कुठल्याही शेतकऱ्याकडे चारा उपलब्ध नाही. छावण्या बंद झाल्यास जनावरांची उपासमार होईल. त्यामुळे छावण्या बंद करू नयेत, अशी मागणी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली.

या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. तालुकाप्रमुख राजू भगत, किशोर पवार, संपत वाघमोडे, राजू भगत, चांगदेव शिंदे, मोहन वाघमोडे, उद्धव शिंदे, दिलीप चितालकार आदींसह साकत, नारायणडोह, रुईछत्तीशी, गुणवाडी, हातवळण, वडगाव तांदळी आदी गावांतील शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी प्रभारी तहसीलदार अभिजित बारावकार यांच्याशी चर्चा केली.  प्रशासनाने निर्णय घेऊन छावण्या चालू करण्याचे आदेश दिले नाही; तर सोलापूर-साकत रोडवर रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com