एफआरपीप्रश्‍नी साखर आयुक्तालयावर धरणे

धरणे आंदोलन
धरणे आंदोलन

पुणे ः नितळी (जि. उस्मानाबाद) येथील जय लक्ष्मी साखर कारखान्याने २०१४-१५ नंतर गाळप केलेल्या ३८० शेतकऱ्यांचे सुमारे साडे चार कोटी रुपये अद्यापही दिले नाहीत. संबंधित कारखान्यावरील उपपदार्थाची जप्ती करून थकबाकी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तलयासमोर धरणे दिले.   शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद घोडके, मल्लप्पा कुतोडे, चंद्रकांत कर्पे, मनोहर बंदपट्टे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. अरविंद घोडके म्हणाले, की २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाचा अद्यापपर्यंत पहिला हप्ता मिळाला नाही. औरंगाबाद हायकोर्टाने शेतकऱ्यांची देणे देऊनच कारखाना चालू करावा, अशी अट घालून कारखाना चालू करण्यास परवानगी दिली. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही गावचे व शेतकऱ्यांचे २०१४-१५ मधील थकीत बिले एक ते १५ डिसेबरपर्यंत वाटप केले. त्यानंतर सुमारे साडेचार कोटी रुपये थकीत आहे. पैसे मागायला गेल्यानंतर अरेरावी, उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळकाढूपणा करण्यात आला आहे.  शेतकऱ्यांनी उपोषण, रास्ता रोको, निवेदने दिल्यानंतर जयलक्ष्मी कारखान्याचे चेअरमन व संचालकांनी एक कोटींचा चेक जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. पण तो न वटल्याने बाऊन्स झाला. त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई संबंधित खात्याने केली नाही. आता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तत्काळ जयलक्ष्मी साखर कारखान्यावर चालू वर्षातील ९० हजार टन ऊस गाळप केलेल्या साखर, मळी, मोलॅसीस, बगॅस या उपपदार्थावर विक्रीबंदी घालून जप्ती करावी. त्यानतंर संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना उपपदार्थाची विक्रीची परवानगी देऊन २०१४-१५ मधील थकीत शेतकऱ्यांच्या उसाचे बिले देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com