नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी रत्नागिरीत मोर्चा

नाणार प्रकल्पाच्या मागणीसाठी मोर्चा
नाणार प्रकल्पाच्या मागणीसाठी मोर्चा

रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी तसेच प्रकल्पाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. २०) निघालेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते. यात नाणार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचा देखील सहभाग होता. याशिवाय राजापूर, लांजा, रत्नागिरी या भागातील ग्रामस्थ, व्यापारी तरुण देखील या मोर्चासाठी आले होते. 

‘चला असत्याकडून सत्याकडे’, ‘आता नाही तर कधीच नाही’, असे फलक घेऊन व घोषणा देत या मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरवात झाली. हा मोर्चा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी हजारो मोर्चेकरी एकत्र आले. प्रकल्प समर्थकांतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार असून, स्थानिक शेतकरी देखील या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाणार येथे हा प्रकल्प व्हावा, अशी जनतेची भावना आहे. ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावी व मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

कोकण विकास समितीने नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी हे आंदोलन केले होते. त्याला सर्व स्तरावरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोकणात चांगले उद्योग यावेत, असे जनतेलाही वाटत असल्याचे सिद्ध झाले आहे. या मोर्चामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com