नांदेड येथे ऊस बिलासाठी ‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन

थकीत एफआरपीसाठी आंदोलन
थकीत एफआरपीसाठी आंदोलन

नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडील २०१८-१९ मधील गाळप हंगामातील थकीत ऊस बिल एफआरपीनुसार १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (ता. १३) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

विभागातील कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु अद्यापही एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम अदा केलेली नाही. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना थकीत ऊस बिलामुळे त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे थकीत ऊस बिलाची रक्कम येत्या १० दिवसांत विलंब कालावधीतील १५ टक्के व्याजासह अदा करण्यात यावी.

पूर्णा युनिट १ ने शेतकऱ्यांकडून शेअरच्या नावखाली घेतलेली अनामत रक्कम परत करावी. वाहनचालकांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबावावी. विभागातील काही कारखाने रिकव्हरी कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत त्यामुळे १०.५० टक्के उताऱ्याप्रमाणे एफआरपीची रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशनराव देळूबकर, युवा आघाडीचे अध्यक्ष हनुमंत राजेगोर, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे (परभणी), रावसाहेब अडकिने, किरण कदम आदी सहभागी झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com