अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे श्रीरामपुरात आंदोलन

अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे  आंदोलन
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर बंधाऱ्यापर्यंत अनधिकृत बंधारे बांधले गेले आहेत. हे अनधिकृत बंधारे काढावेत, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.१९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे श्रीरामपूर येथे आंदोलन करण्यात आले.

श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत मागण्यांचे निवेदन दिले.

‘स्वाभिमानी’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भंडारदरा धरणापासून ते ओझर बंधाऱ्यापर्यंत अनाधिकृत बंधारे बांधले आहेत. भंडारदरा धरणातून आवर्तन सोडल्यानंतर साधारण पंधरावर्षांपूर्वी ओझर बंधाऱ्यापर्यंत पाणी यायला ६५ तास लागत होते. आता जवळपास नव्वद तास लागतात. अनधिकृतपणे पाणी अडवण्याचा विषय हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे.

आंदोलनात जितेंद्र भोसले, दीपक बारहाते, सदाशिव अनाप, लक्ष्मण धोत्रे, अशोक बडधे, बापूसाहेब आदिक, पुरुषोत्तम थोरात, विकास थोरात यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com