पाण्यासाठी अधिकाऱ्याच्या टेबलवर भाकरी खाऊन आंदोलन

भाकरी खाऊन आंदोलन
भाकरी खाऊन आंदोलन

औरंगाबाद: दुष्काळी स्थितीमुळे तीव्र पाणीटंचाईग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड विलास बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.१७) औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या टेबलवर भाकरी खाऊन आंदोलन केले. जायकवाडी धरणाच्या कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक कार्यालयासमोर बुधवारी (ता.९) आणि गुरुवारी (ता.९) ठिय्या आंदोलन केल्यानंतर सोमवारपर्यंत (ता.१३) पिण्यासाठी पाणी सोडण्यासाठीचा प्रस्ताव शासनास पाठविण्याचे आश्वासन दिले होते.  परंतु अद्याप प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त असताना गनिमी काव्याने आत प्रवेश करत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सहसचिव कॉम्रेड विलास बाबर, कॉम्रेड राजेभाऊ राठोड, सुभाष काळदाते, दीपक बिडगर, आबासाहेब गवळी आदींनी गावात पाणी नाही, त्यामुळे पाणी द्या, अशा जोरदार घोषणा देत दुपारी १२ वाजता कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्या टेबलवर सोबत आणलेल्या भाकरी खाऊन आंदोलन केले.  या वेळी जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर पाणी डाव्या कालव्यातून सोडण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला. त्याची प्रत आंदोलनकर्त्यांना देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com