प्रफुल्ल कदम
प्रफुल्ल कदम

हक्काच्या पाण्यासाठी किसान आर्मीचे फोन आंदोलन

पुणे ः टाटा कंपनीच्या सहा धरणांतील आणि कोयनातील पाणी पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला द्यावे, उस्मानाबादसह राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांसाठीही हे पाणी खुले करावे, यांसह अन्य मागण्या किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केल्या. 

दुष्काळग्रस्तांना हक्काचे पाणी न दिल्यास २८ जानेवारीपासून फोन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मागण्या मान्य न झाल्यास प्रत्येक गावातील शेतकरी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन करणार आहेत. अशा प्रकारचे देशातील हे पहिलेच आंदोलन असेल, असेही ते म्हणाले. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्‍याला पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्‍यक असणारे पाणी आरक्षित करावे यासह इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

असे होणार फोन आंदोलन हक्काचे पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारला २६ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २८ जानेवारीपासून ‘फोन आंदोलन’ केले जाईल. प्रत्येक गावातील शेतकरी मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा बंगला आणि राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयात सतत फोन करून पाण्याबाबत विचारणा करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com