बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण येथे आंदोलन

पैठण येथे आंदोलन
पैठण येथे आंदोलन

पैठण, जि. औरंगाबाद  : तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) शेतकरी प्रकल्पाच्या भिंतीखालील गोदावरी पात्राच्या काठावर ठाण मांडून बसले. सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने शेतकऱ्यांना न दिल्याने आंदोलन सुरूच होते.

अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात याआधी १२ मेपर्यंत गोदावरी पात्रात व डाव्या कालव्यात पाणी सोडले नाही तर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यावर निर्णय न झाल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम होते. त्यानुसार सोमवारी पैठणच्या शिवाजी चौकातून शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने कूच केले. प्रकल्पाच्या भिंतीपासून काही अंतरावर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले.

पोलिसांचा अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांच्याशी संवाद झाल्यानंतर शेतकरी प्रकल्पाच्या भिंतीखालील गोदावरी नदीच्या कोरड्या पात्रात उतरले. तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी सुरक्षेची खबरदारी म्हणून जीवरक्षक पथक व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी जयाजीराव सूर्यवंशी यांनी ५ वाजेपर्यंत प्रशासनाने मागण्यांविषयी निर्णय घ्यावा, तोवर शेतकरी नदीकाठावर बसून, राहतील असे स्पष्ट केले. त्यांनतर मात्र कोणतीही घटना घडल्यास त्याला प्रशासन व शासन जबाबदार असेल, असेही श्री. सूर्यवंशी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com