नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभे तयार भात पडले असतील, तर अशा भाताच्या लोंब्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे वेचून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवाव्यात. खरीप भात
दाणे भरणे (गरव्या जाती), पक्वता (निमगरव्या आणि हळव्या जाती) नुकत्याच झालेल्या मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतातील उभे तयार भात पडले असतील, तर अशा भाताच्या लोंब्या पारंपारिक पद्धतीप्रमाणे वेचून सुरक्षित ठिकाणी आणून ठेवाव्यात. उन्हे पडल्यास वाळविण्यासाठी पसरून ठेवाव्यात. पडलेले भात भिजल्यामुळे कोंब फुटण्याची शक्यता असते. तातडीने अशा लोंब्या वेचून सुरक्षित ठिकाणी आणल्यास काही प्रमाणात नुकसान कमी होण्यास मदत होईल. भात खाचरातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आणि गरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तयार भात पिकाची कापणी पावसाची उघडीप असताना करावी. कापणी केलेले भात शेतात न ठेवता लगेचच सुरक्षित ठिकाणी न्यावे. लगेच मळणी करावी. उत्पादित पीक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. पावसामुळे शेतातील उभे तयार झालेले नागली, वरईचे पीक पडले असल्यास भाताप्रमाणेच त्यांच्याही लोंब्या वेचून सुरक्षित ठिकाणी आणाव्यात. उन्हे पडताच वाळविण्यासाठी पसरून ठेवाव्यात. नाचणी, वरई पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तयार नागली/ वरई पिकाची कणसे विळ्याने कापून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. वाळल्यानंतर मळणी करावी. नुकत्याच झालेल्या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे आंबा व काजू बागेत कोवळ्या पालवीवर करपा आणि नारळ व सुपारीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी पावसाची उघडीप असताना १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा निर्माण झाल्याने बी कुजण्याची शक्यता आहे. तसेच हवामान अंदाजानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असल्याने कलिंगड व भेंडी या पिकाच्या पेरणीची कामे पुढे ढकलावीत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हळद बागेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. भाजीपाला रोपवाटिका व नवीन फळबाग लागवड
पावसामुळे नवीन लागवड केलेल्या फळबागा तसेच भाजीपाला रोपवाटीकेतील साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. संपर्क- ०२३५८- २८२३८७ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).