बोंड अळीग्रस्त बियाणे नमुने तपासणीसाठी पाठवा : कृषी आयुक्त

गुलाबी बोंडअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिकाअंतर्गंत कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथे मास ट्रॅपिंगसाठी कपाशीच्या पिकामध्ये लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्याची पाहणी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी केली.
गुलाबी बोंडअळी एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिकाअंतर्गंत कात्नेश्वर (ता.पूर्णा) येथे मास ट्रॅपिंगसाठी कपाशीच्या पिकामध्ये लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्याची पाहणी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी केली.

परभणी ः यंदा राज्यापुढे बोंड अळी निर्मूलनाचे आव्हान आहे. सद्यस्थितीत बोंड अळी आढळून आलेल्या कपाशीच्या वाणांचे बियाणे नमुने काढून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवावेत. बोंड अळी नियंत्रणासाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कृषी विभागातील कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिला. बोंड अळी नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी रविवारी (ता. २९) लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आले असता रात्री आठ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीत श्री. सिंह बोलत होते. या वेळी कुलगुरू डॅा. अशोक ढवण, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, जिपचे मुख्यकार्यकारी अधिकारी बी. पी. पृथ्वीराज, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी. एस. झंवर आदी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, की क्रॅापसॅपमधील निरीक्षण नोंदीची फिडींग तसेच रॅन्डम पद्धतीच्या नोंदीच व्यवस्थित केल्या जात नसल्याचे आढळून आले आहे. ही गंभीर बाब आहे. यापुढे बोंड अळी नियंत्रणाच्या कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गतवर्षी गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाची नुकसानभरपाई द्यावी लागली. यंदा बोंड अळी निर्मूलनाचे आव्हान पेलण्यासाठी कृषी विभाग सोबत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे अशी सक्षम यंत्रणा आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून दररोज आवाहन करत शेतकऱ्यांना बोंड अळी नियंत्रणासाठी जागरुक करावे.जिल्ह्याच्या संकेतस्थळावर बोंड अळी नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, ग्रामपंचायतीच्या सभांमध्ये माहिती द्यावी. सध्या वेट अॅँड वाॅचसाठी वेळ नाही. डू आॅर डाय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे केवळ जनजागृतीचा उपयोग नाही. डॅमेज कंट्रोलसाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. ‘‘बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळलेल्या वाणाचे बियाणे नमुने काढून ते नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवावेत. प्रादुर्भाव झालेल्या गावांव्यतिरिक्त परिसरातील अन्य गावांमध्ये देखील सर्वेक्षण करावे. जिनिंग, प्रेसिंग कारखान्यांच्या परिसरासह परिसरातील गावांची तपासणी करावी,’’ अशा सूचनाही श्री. सिंह यांनी केल्या. डाॅ. ढवण म्हणाले, की बोंड अळी निर्मूलनासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभाग यांच्यात समन्वयक आवश्यक आहे. रावेचे विद्यार्थीदेखील सर्वेक्षणासाठी मदत करतील. डॅा. झंवर म्हणाले, की कपाशीच्या पिकाचे दररोज सर्वेक्षण करावे. डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. श्री. जगताप म्हणाले, की यंदा १० जून आधी व नंतर अशी दोन टप्प्यात कपाशीची लागवड झाली आहे. १० जूननंतरच्या कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com