दहा कोटी शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’ योजनेचा लाभ देणार ः केंद्रीय कृषिमंत्री तोमर

नरेंद्रसिंह तोमर
नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘पीएम-किसान’ योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वर्षाला सहा हजार रुपये मदत देण्यात येत आहेत. यंदा सरकार देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. केंद्र सरकारने या योजनेचे दोन टप्पे शेतकऱ्यांना दिले आहेत, असे सांगून ते म्हणाले, की जवळपास ५ कोटी ८८ लाख लघू शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. तर जवळपास ३ कोटी ४० लाख शेतकऱ्यांना दुसरा हप्ताही मिळाला आहे. पश्‍चिम बंगाल वगळता सर्व राज्ये या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेची प्रगती उत्तम असून आम्ही या वर्षी किमान दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.   कृषिमंत्री म्हणाले, की देशातील सर्वच १४ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मग त्यांच्याकडे कितीही शेती असो. केंद्र सरकारने २०१९-२० मध्ये ‘पीएम-किसान’ योजनेसाठी ८७ हजार २१७.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com