नाशिक : ‘‘कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल पडून राहिला. मागणी व पुरवठा साखळी खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या परिस्थितीत संबंधित खात्यांनी लक्ष दिले असते, तर नुकसान टाळता आले असते. त्यामुळे कोरोनाच्या संकटात राज्याचे कृषी आणि पणन खाते पूर्णतः अपयशी ठरले आहे’’, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला.
रविवारी (ता.३१) रोजी खोत यांनी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. कोरोनाच्या संकटात राज्याचे कृषी पणन खाते अपयशी ठरले. त्यातच आता आता सहकार विभागाची कार्यवाही संथ आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी झाली नाही. आता खरिपाच्या तोंडावर राज्यात पीककर्ज वितरणाची स्थिती गंभीर आहे. बियाणे, खतांचा पुरेसा पुरवठा होत नाही. चढ्या भावाने खते खरेदी करावी लागत असल्याची बाब त्यांनी मांडली. खोत म्हणाले...
बँकेविरुद्ध गुन्हे दाखल करा
कर्ज आणि दीर्घ व मध्यम मुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे हे सहकार खात्याच्या हातात आहे. पण, ते काही करत नाहीत. खरीप हंगामासाठी पीककर्ज न देणाऱ्या बँकेविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे खोत यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.