कृषी विभागाने उदासीनतेने धान्य महोत्सव टाळला

दुष्काळी स्थितीमुळे धान्य महोत्सव घेतला नाही. धान्य महोत्सवाऐवजी शेतकरी मेळावा घ्या, अशा सूचना केंद्र सरकारच्या होत्या. त्यानुसार एक मेळावा घेतला. दुसरा मेळावा गुरुवारी (ता. ७) लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतला. जो निधी होता, तो या मेळाव्यासाठी खर्च करीत आहोत. त्यात शेतकऱ्यांचा सत्कार केला. तज्ज्ञांचे मार्गदर्शनही झाले. - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव नवनिर्मिती शेतकरी मंडळाने महोत्सवात दादर (ज्वारी) विक्रीची तयारी केली. दादरची स्वच्छता, प्रतवारी केली. ४० सभासद शेतकरी आहेत. प्रत्येकाकडे दर्जेदार, अशी किमान ३० ते ३५ क्विंटल दादर होती. परंतु महोत्सवच होत नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. - किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, (आसोदा, जि. जळगाव) निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे धान्य महोत्सव झाला नाही. एका अधिकाऱ्याने पालकमंत्र्यांची दिशाभूल करून हा महोत्सव घेणे टाळले. यासंदर्भात नियोजन समितीच्या सभेत आवाज उठविणार आहे. - उन्मेष पाटील, आमदार
कृषी विभागाने उदासीनतेने धान्य महोत्सव टाळला
कृषी विभागाने उदासीनतेने धान्य महोत्सव टाळला

जळगाव : राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यातच कृषी विभागाची चालढकल व उदासीनता आहे. त्यामुळे यंदाचा धान्य महोत्सव टाळण्यात आला आहे. चक्क १४ लाख रुपये निधी परत करण्याची वेळ आली आहे. कृषी विभागातील बेजबाबदार, कामचुकार यंत्रणेबाबत शेतकरी, लोकप्रतिनिधींनी जाहीर नाराजी व्यक्त केली. 

कृषी विभागाने हा महोत्सव टाळताना दुष्काळाचे कारण पुढे केले. परंतु नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतही दुष्काळ होता. तेथे मात्र मागील महिन्यातच धान्य महोत्सव यशस्वीपणे पार पडला. नाशिकचे पालकमंत्री, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी देखील जळगावात धान्य महोत्सव का घेतला नाही, असा प्रश्‍न प्रशासनाला विचारला. नाशिकमध्येही हा महोत्सव झाला.

कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) हा महोत्सव घेण्यात येतो. मागील पाच वर्षे हा महोत्सव झाला. दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल या महोत्सवात होते. शेतकरी, ग्रामीण व शहरी भागांतील महिला बचत गटांचे धान्य, उत्पादनांचे स्टॉल या महोत्सवात असतात. अनेक शेतकऱ्यांनी महोत्सवात आपले धान्य विक्री करण्यासाठी धान्याची पॅकिंग, ब्रॅडिंगही केले. काही शेतकऱ्यांनी आपले संपर्क क्रमांक, पत्ता असलेले कार्डही तयार करून घेतले. परंतु उदासीन कृषी यंत्रणेमुळे महोत्सव मोडीत निघाल्याने शेतकऱ्यांचाही हिरमोड झाला आहे.

कृषी विभागाला हा महोत्सव घेणे शक्‍य होत नसेल, यंत्रणा पुरेशी नसेल, तर आपण हा महोत्सव चाळीसगावात घेऊ, अशी भूमिका आमदार उन्मेष पाटील यांनी घेतली होती. परंतु, त्यासही कृषी विभागाने सपशेल नकार दिला. हा महोत्सव घेण्यासंबंधी शेतकऱ्यांपर्यंत पोचावे लागले, स्टॉल नोंदणी, मार्गदर्शन सत्र, वक्ते, स्टॉलधारक महिलांचा निवास व भोजन याची व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्यांशी दांडगा संपर्क असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच हे काम शक्‍य होते. हे काम करण्याबाबत उदासीनता असल्याने हा महोत्सव कृषी यंत्रणेने टाळल्याची टीका शेतकरी करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com