कोल्हापूरात योजनेच्या लाभासाठी कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारात

अनेक गरीब शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसते. यामुळे किंवा अन्य कारणामुळे ते योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी आम्हीच असे शेतकरी शोधून त्यांना लाभ देण्याविषयी काम सुरू केले आहे. यासाठी गाव पातळीवरील कृषी सहायकांची मदत घेऊन हे काम प्रभावीपणे केले जात आहे. गेल्या चार वर्षांत ६४ हून अधिक प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी पाठविले आहेत. - हरिदास हावळे, तालुका कृषी अधिकारी, करवीर
कोल्हापूरात योजनेच्या लाभासाठी कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारात
कोल्हापूरात योजनेच्या लाभासाठी कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या दारात

कोल्हापूर : शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा म्हटल की कागदपत्रे किंवा अन्य बाबींमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजना कष्टप्रद वाटतात. जिल्ह्यातील करवीर तालुक्‍यात मात्र कृषी विभागाने एक वेगळे काम करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत जखमी अथवा मृत झालेल्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्यांना लाभ देण्याचे काम तालुक्‍यातील कृषी कर्मचारी करीत आहेत.  राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.  अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसाह्य देण्यात येते. शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसाह्य देण्यात येते.  अनेकदा या योजनेची माहिती नसल्याने शेतकऱ्यापर्यंत ही योजना जात नाही. यामुळे करवीर तालुका कृषी कार्यालयाने स्वत:च शोध घेऊन हा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून राबविली आहे. वृत्तपत्रे व अन्य काही माध्यमांतून शेतकऱ्याला वरील प्रकारचा अपघात झाल्याचे समजताच कृषी विभागाचे कर्मचारी संबंधित शेतकऱ्याचा शोध घेतात. कृषी सहायक त्या गावात जाऊन परिस्थितीची माहिती कृषी विभागाला देतो. शेतकऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या नातेवाइकांकडे आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सूचना केली जाते.    कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्याच्या घरी जाऊन कागदपत्राची पूर्तता करून घेतात. मदतीसाठी विलंब लागू नये यासाठी कागदपत्रे लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. शेतकऱ्यांने अर्ज न करता त्याला लाभ देण्यासाठी थेट त्याच्या घरी जाऊन त्याचा लाभ देण्यसाठी कृषी विभागाने सुरू केलेले प्रयत्नाबाबत शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com