टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कृषिमंत्री भुसे

महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड आलेली आहे. राज्यभर ही कीड वाढण्याधीच संपण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कृषिमंत्री भुसे
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कृषिमंत्री भुसे

नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड आलेली आहे. राज्यभर ही कीड वाढण्याधीच संपण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी रात्री कृषी विभागाकडून कीटकनाशकांची फवारणी करून कीड वाढण्याआधीच संपवण्याला यश येईल. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.  खरीप आढावा बैठकीसाठी नगरला आल्यानंतर ‘ॲग्रोवन’ शी बोलताना कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘अमरावती जिल्ह्याच्या काही गावांत २४ मे रोजी टोळधाड आलेली असून ती वाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. ही कीड दिवसा प्रवास करते. लाखोंच्या संख्येने असलेली ही कीड शेतकऱ्यांचे नुकसान करत आहे. त्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या अहवाल आल्यानंतर त्याच रात्री कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. दिवसा मोठा आवाज करून त्या किडींना हाकलून दिले जात आहे. रात्री या किडीची थवा जेथे थांबत आहे तेथे कृषी विभागाचे कर्मचारी कीटकनाशकांची फवारणी करत आहे. त्यासाठी लागणारे कीटकनाशके विभागाकडून उपलब्ध करून दिले जात आहे. मोठ्या झाडांवर हे कीटक थांबले आहेत, तेथे अग्निशामक दलाच्या गाडीतून तर फवारणी केली जाते. या किडीची वाढ होण्याआधीच ती संपवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे आणि त्याला नक्की यश येऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळले असे भुसे म्हणाले. मी त्याबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचे भुसे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com