`अम्फान’चा शेतीला मोठा फटका 

अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यातील पिके उध्वस्त झाली आहेत.
crop
crop

कोलकाता: अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा तडाखा दिला आहे. राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यातील पिके उध्वस्त झाली आहेत. चक्रीवादळामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार हुगली जिल्ह्यात ६००कोटी तर बिरभूम जिल्ह्यात ४६२ कोटींचे शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पश्‍चिम बंगालचे कृषिमंत्री अशिष बॅनर्जी यांनी दिली. 

अम्फान चक्रीवादळाने पश्‍चिम बंगाल किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा दिला. या शेती, घरे, पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले. पुर्व मिदनापूर या किनारपट्टी भागातील जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच बुरद्वान पुर्व जिल्ह्यातील भात पिकाचे ७० टक्के तर बंकुरा जिल्ह्यात ५० टक्के नुकसान झाले आहे. कृषी विभागा राज्यातील नुकसानीची पाहणी करत आहे. 

कृषिमंत्री बॅनर्जी म्हणाले, ‘‘राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांतील शेतीपिके नष्ट झाली आहेत. नेट कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने आम्हाला आतापर्यंत सर्व जिल्ह्यांचा नुकसानीचा अहवाल मिळाला नाही. परंतु प्राथमिक अहवालातून वादळाने केलेल्या विध्वंसाचा अंदाज आला आहे. वादळामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

  पिकांचे मोठे नुकसान  ‘‘पुर्व मिदनापूर जिल्ह्यातील ३० हजार हेक्टरवरील भात पिकाचे, तीळाचे १२ हजार हेकट्र आणि भाजीपाल्याचे ५ हजार हेक्टरवरील नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील विड्याच्या पानांनाही मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा आहे. बिरभूम जिल्ह्यातील केवळ ३० टक्के भाताची काढणी झाली आहे आणि आता उर्वरित भात पाण्याखाली आहे. बनकुरा जिल्ह्यात जवळपास ५० टक्के भात शेतात भिजून पडला आहे. हा भात दोन ते तीन दिवसांपासून शेतात पाण्याखाली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंबा बागांना फटका बसला आहे. ३० टक्के आंबा फळे गळून पडली आहेत. हावडा जिल्ह्यातील फुलशेती पाण्याखाली गेली आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  वादळामुळे झालेले नुकसान  - शेती, घरे, पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान  - राज्यातील २३ पैकी १४ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा  - भात, तीळ, आंबा, भाजीपाला, फुले आदी पिकांना फटका  - हजारो हेक्टरवरील भात पिक तीन दिवसांपासून पाण्याखाली  - भात पिकाचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान  - ३० टक्के आंबा फळे गळून पडली 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com