पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार

पालखेड डाव्या कालव्यातून सिंचनासह बिगर सिंचनाचे आवर्तन देण्यात आल्याने टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या तालुक्यातील गावांना त्याचा लाभ झाला आहे.
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार With agriculture by rotation of palakhed Support for drinking water
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार With agriculture by rotation of palakhed Support for drinking water

येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून सिंचनासह बिगर सिंचनाचे आवर्तन देण्यात आल्याने टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या तालुक्यातील गावांना त्याचा लाभ झाला आहे. या पाण्यामुळे शेतीतील उभ्या पिकांना आधार मिळालाच पण टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्यासाठी देखील फायदा झाला आहे. लाभक्षेत्रातील गोई, कोळगंगा नदीवरील नऊ बंधारेही भरून देण्यात आले आहेत.

पालखेड धरण समूहाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला तथापि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने पालखेड धरण समूहात जवळजवळ ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची तूट होती. मात्र पालखेड डावा कालव्याचे लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची मोठ्या प्रमाणात पिके घेतली आहेत. या वर्षी दोन आवर्तने मिळतील या अंदाजाने शेतकऱ्यांनी अधिक क्षेत्रावर पिके घेतली.

वाढीव क्षेत्रास रब्बीचे दोन आवर्तने तसेच पालखेड धरण समूह कमी पाणीसाठा असल्याने आणि रब्बी आवर्तनाची मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी व संस्थांनी उशिरा केल्यामुळे रब्बी दोन व आकस्मित आरक्षण आवर्तन एकत्र करून पालखेड डावा कालव्याचे आवर्तन १५ मार्चपासून १३ एप्रिलपर्यत सुरू होते.

या आवर्तनात पालखेड डाव्या कालव्यावरील सर्व १६० पाणीवापर संस्थांना त्यांच्या मंजूर कोट्याप्रमाणे पाणी देण्यात आले. तसेच येवला नगरपालिका, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व मनमाड नगर परिषद या संस्थाचे साठवण तलाव या आवर्तनातून पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले. आकस्मित आरक्षणात मंजूर असलेले दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील सर्व म्हणजे जवळजवळ ५२ गावांना पिण्याचे पाणी देखील पुरविण्यात आले. पालखेडच्या लाभ क्षेत्रात येवल्यातील ४२ गावांचा समावेश असून, या गावांनाही पाण्याचा लाभ झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढलेला असताना व कार्यक्षेत्रावरील सिंचन कर्मचारी अतिशय कमी असताना देखील आवर्तन यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेले असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांनी दिली. पुढील आवर्तन २५ जूननंतर देण्याचे नियोजन असल्याने सध्या पुरविण्यात आलेले पाणी येवला नगरपालिका, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड तसेच मनमाड पालिका यांनी जून अखेरपर्यंत पुरवावे, अशा सूचना देखील गोवर्धने यांनी दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com