खरिपासाठी कापूस बियाण्यांच्या २ कोटी पाकिटांची उपलब्धता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : खरीप २०१८ मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या माध्यमातून २ कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

मंत्रालयात खरीप २०१८च्या नियोजनासाठी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री म्हणाले, राज्यात ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र असून या खरीप हंगामासाठी ४० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ६० लाख बियाणे पाकिटांची गरज असून या वर्षी २ कोटी ५४ हजार पाकिटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यंदा बियाणे कंपन्यांनी त्यांच्या गोदामातून नमुने काढूनच विक्री करण्याच्या शासनाच्या धोरणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या हंगामात कापसाच्या ३७६ वाणांना परवानगी देण्यात आली असून २६ दीर्घ कालावधी वाणास परवानगी नाकारण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com